
साहीत्य- कणीक, गूळ, पाणी
कृती-पाण्यात गूळ टाकून पाणी उकळवणे.व त्या गूळाच्या पाण्यात मावेल तेवढी कणीक घेऊन घट्ट भिजवणे. व त्याचे फोटोत दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे दिवे करुन घेऊन त्यांना चांगली वाफ आणावी. नंतर प्रत्येक दिव्यात भरेल एवढे तूप घालून गरम गरम खावेत.
यासाठीचे प्रमाण: दोन वाट्या (चिरलेल्या) गुळासाठी अर्धी वाटी पाणी. पाणी आणि गूळ गरम करून गूळ विरघळू द्यावा, त्यात सहा टेबलस्पून तेल घालावे. हे गुळाचे पाणी परातीत ओतून ते कोमट झाल्यावर त्यात तीन वाट्या कणिक भिजवावी. कणिक भिजवताना चिमुटभर मीठ आणि सोडा घालावा.
ReplyDeleteअश्विनी हे केळकरांचे प्रमाण झाले. मुद्गलांचे प्रमाण तीनास तीन किंवा कणकेपेक्षा गूळ जरा जास्तच.
ReplyDeleteकणीक जाड हवी आणि तूप रवाळ हवे.
ReplyDelete